Total Pageviews

Sunday, 3 August 2025

भारताच्या हवाई दलाची घटती लढाऊ क्षमता : तातडीने कठोर पावले उचलणे अत्यंत आवश्यक

https://epaper.saamana.com/editionname/Mumbai/SAMANA_MUM/page/4/article/SAMANA_MUM_20250802_4_2 

भारताच्या हवाई दलाला (IAF) चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत एकाच वेळी मुकाबला करण्याची क्षमता राखण्यासाठी 42 लढाऊ स्क्वॉड्रन्सची आवश्यकता आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही क्षमता वाढण्याऐवजी सातत्याने कमी होत आहे. सध्या, हवाई दलाकडे 31 लढाऊ विमानांचे स्क्वॉड्रन्स आहेत.

ऑक्टोबर महिन्यात दोन जुन्या मिग-21 विमानांचे स्क्वॉड्रन्स सेवेतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे, आपल्याकडील स्क्वॉड्रन्सची संख्या घटून 29 वर येईल. याचा अर्थ, आपल्याकडे उपलब्ध लढाऊ विमानांची संख्या अत्यंत अपुरी आहे.

प्रयत्न अत्यंत अपुरे पडत आहेत

लढाऊ विमानांची संख्या वाढवण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत, परंतु ते अत्यंत अपुरे पडत आहेत. स्वदेशी बनावटीचे तेजस विमाने भारतीय हवाई दलात सामील होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु, या विमानांसाठी आवश्यक असलेले इंजिन आपण भारतात तयार करू शकलेलो नाही. परिणामी, आपल्याला ही इंजिने अमेरिकेकडून मिळणे अपेक्षित होते. अनेक वेळा करारावर सह्या होऊनही, अमेरिका अजूनही GE (जनरल इलेक्ट्रिक) ची इंजिने पुरवण्यासाठी तयार नाही.

या समस्येवर मात करण्यासाठी, आपण फ्रान्सकडूनही विमानांच्या इंजिनचे सह-उत्पादन (co-production) करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, या केवळ सध्या तरी योजनाच आहेत आणि त्यांची अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाही.

या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.

पाकिस्तानसोबतच्या भीतीदायक समानतेकडे झेप

ऑक्टोबर 2025 पासून भारताकडे फक्त २९ लढाऊ विमान स्क्वॉड्रन असतील.पाकिस्तानकडे २५ आहेत. ही हवाई दलाच्या बाबतित जवळपासची समानता आहे, आणि ती भीतीदायक आहे, विशेषतः पाकिस्तानचा 'मित्र ' चीनकडे ६६ स्क्वॉड्रन असल्याने. एका स्क्वॉड्रनमध्ये साधारणपणे १८-२० लढाऊ विमाने असतात.

पुढच्या दोन महिन्यांत भारताकडे ५२२ लढाऊ विमाने असतील. पाकिस्तानकडे ४५०, तर चीनकडे १२०० आहेत. हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग म्हणाले की, भारताला दरवर्षी किमान ४० लढाऊ विमानांचा समावेश करणे आवश्यक आहे. सध्या हे अशक्य दिसत आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारताने आपला नविन फ़ायटर विमाने बनवण्याचा वेग वाढवला नाही , तर जुनी मिराज, जॅग्वार आणि इतर मिग प्रकारची विमानांची स्क्वॉड्रन टप्प्याटप्प्याने बाहेर काढली जातील आणि १०वर्षांत भारताकडे पाकिस्तान पेक्षा कमी लढाऊ स्क्वॉड्रन असतील.या चिंतेचे तात्काळ कारण म्हणजे भारतीय हवाई दलाकडून  आपली शेवटची दोन मिग-२१ स्क्वॉड्रन बाहेर काढणे आहे. परंतु यामागे अनेक वर्षांपासूनची मोठी कारणे आहेत.

एमएमआरसीए (MMRCA) धक्का:

२०१५ मध्ये १२६-जेट मध्यम मल्टी-रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट कराराच्या रद्द झाल्यामुळे भारताकडे असलेल्या लढाउ विमानांच्या संख्येत मोठा फरक पडला व  विमान संख्या कमी झाली. भारताने फ्रान्ससोबतच्या सरकारी-ते-सरकारी कराराद्वारे मिळवलेली ३६ राफेल विमाने IAF च्या जुन्या लढाऊ विमानांच्या ताफ्याच्या तुलनेत अजिबात पुरेशी नव्हती. भारताने नौदलासाठी आणखी २६ राफेलची ऑर्डर दिली आहे.

भारतात निर्मिती?(Make In India)

भारताची पाकिस्तानवरील हवाई श्रेष्ठता टिकवून ठेवण्यासाठी स्वदेशी तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट ही मोठी योजना होती. IAF कडे सध्या तेजस मार्क-१ ची फक्त दोन स्क्वॉड्रन आहेत, म्हणजे ३८ लढाऊ विमाने आहेत.

सुधारित तेजस मार्क-१ए जेट्सची डिलिव्हरी, ज्यापैकी ८३ HAL द्वारे वितरित केली जाणार आहेत, अनेक उत्पादन डेडलाइनमधून पुढे सरकली आहे. एकही विमान सेवेत नाही. हे अंशतः GE च्या F404 इंजिनच्या वितरणातील मोठ्या विलंबांमुळे आणि अंशतः एस्ट्रा एअर-टू-एअर क्षेपणास्त्रांच्या एकत्रीकरणातील अद्याप न सुटलेल्या तांत्रिक समस्यांमुळे आणि काही गंभीर एव्हिओनिक्सच्या दुरुस्तीमुळे आहे.

IAF ला आशा आहे की आणखी ९७ तेजस मार्क-१ए येतील, तसेच अधिक शक्तिशाली GE F-414 इंजिनसह आणखी १०८ तेजस मार्क-२ प्रकारची विमाने येतील. हे इंजिन ८०% तंत्रज्ञान हस्तांतरणासह भारतात सह-उत्पादित केले जाणार आहे. पण हे सर्व सध्या कागदावरच आहे.

इंजिन निकामी:

'मेड इन इंडिया' कार्यक्रमातील मुख्य अडथळा म्हणजे स्वदेशी जेट इंजिन तयार करण्याची अक्षमता. जुना कावेरी इंजिन विकास प्रकल्प मानके पूर्ण करू शकला नाही. आधुनिक लढाऊ जेट इंजिन ही हजारो भागांची जटिल यंत्रे आहेत, जी उच्च दाब आणि तापमान सहन करू शकली पाहिजेत. लढाऊ जेट इंजिन विकसित करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स लागतात.

इंजिनचे चार भाग असतात - कंप्रेसर, कम्बशन चेंबर, टर्बाइन आणि नोझल.

इंजिनचा गरम भाग, कम्बशन चेंबर आणि टर्बाइन ब्लेड्स, योग्यरित्या तयार करणे कठीण आहे, यासाठी प्रगत सिरॅमिक्सची आवश्यकता असते. परंतु मटेरियल सायन्समध्ये भारताची फ़ार कमी आहे. हिरव्या हायड्रोजनच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सिरॅमिक-कोटेड इलेक्ट्रोड्ससारख्या मूलभूत वस्तूंच्या निर्मितीसाठीही भारताला संघर्ष करावा लागत आहे,म्हणजेच या भारतात बनत नाही व आयात केल्या जातात. त्यामुळे, किमान नजीकच्या भविष्यात येथे बनवलेल्या लढाऊ जेट इंजिन बनण्याची शक्यता नाही.

इंजिन निर्मितीवर लक्ष:

भारताने स्वदेशी जेट इंजिन विकसित करण्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. 'कावेरी' प्रकल्पातील चुकांमधून शिकून, परदेशी तंत्रज्ञान हस्तांतरणासोबतच (ToT) देशांतर्गत संशोधन आणि विकासासाठी (R&D) मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी. यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग आणि परदेशी कंपन्यांसोबतचे संयुक्त उपक्रम (Joint Ventures) वाढवावेत.

संरक्षण क्षेत्रातील 'मेक इन इंडिया'ला बळकटी:

केवळ विमानांचे भाग जोडण्याऐवजी, त्यांच्या महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या घटकांचे (उदा. एव्हिओनिक्स, रडार, विशेष मिश्रधातू) उत्पादन देशातच कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत.

केवळ योजना, योजना, योजना्च

११४ मल्टी-रोल फायटर एअरक्राफ्ट खरेदी करण्याच्या योजना आहेत. पण यावर कोणतीही प्रगती झालेली नाही.

त्यानंतर, प्रस्तावित ५ व्या पिढीचे प्रगत मध्यम कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. याबद्दल इतकेच म्हणता येईल की, ही एक कल्पना आहे,अजुन पण काहीही हालचाल सुरु झालेली दिसत नाही.

ड्रोन हा उपाय आहे का?

युद्धाचे स्वरूप बदलल्यामुळे लढाऊ विमाने आणि युद्धनौका यांसारख्या मोठ्या लष्करी प्लॅटफॉर्मची उपयुक्तता कमी होत आहे, असे अनेक तज्ज्ञांना वाटते. युक्रेनने रशियन आक्रमणाविरुद्धच्या युद्धात ड्रोन्सचा वापर करून आश्चर्यकारक लढाया जिंकल्या आहेत, रशियन युद्धनौका आणि लढाऊ विमाने यूएव्हीने (UAVs) नष्ट केली आहेत, ज्यांचा खर्च जेटच्या किमतीच्या एका अंशाएवढा असतो.

युक्रेन यावर्षी ४ दशलक्ष ड्रोन तयार करेल. भारताच्या सशस्त्र दलांनी महागड्या विमांनपेक्षा अधिक ड्रोन वापरण्यावर भर दिला पाहिजे. रशीया युक्रेन लढाई व ओप सिंधुरचा हा एक मोठा धडा आहे.

ड्रोन तंत्रज्ञानात गुंतवणूक:

आधुनिक युद्धाचे स्वरूप बदलत असताना, केवळ पारंपरिक लढाऊ विमानांवर अवलंबून न राहता, अत्याधुनिक ड्रोन आणि मानवरहित हवाई वाहनांच्या (UAVs) विकासात, उत्पादनात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी. यासाठी खासगी कंपन्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

पण दोन समस्या आहेत. कोणत्याही देशांतर्गत उत्पादनाला सतत विकसित होणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाचा हिशोब ठेवावा लागेल व त्या वेगाने निर्मिती करावी लागेल. आणि ड्रोन चालवण्यासाठी विशेष ड्रोन युनीट किंवा पायलटची गरज आहे. भारताला एक विशेष ड्रोन कोरची (corps) आवश्यकता आहे.

 

लढाऊ स्क्वॉड्रन्सची सातत्याने कमी होत आहे, लढाऊ विमानांची संख्या अत्यंत अपुरी आहे.या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भारताने तातडीने आणि कठोर पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ योजना आखण्याऐवजी त्यांची जलद अंमलबजावणी हाच कळीचा मुद्दा आहे.


No comments:

Post a Comment