SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Monday, 17 November 2025
%Shaikh Hasina यांना फाशीची शिक्षा, भारतासाठी ठरु शकते का धोक्याची घंटा1...
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. आंदोलकांना मारण्यासाठी हेलिकॉप्टर आणि घातक शस्त्रांचा वापर करण्याचे आदेश दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. बांगलादेशमधील हिंसाचार प्रकरणी बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) आज सोमवारी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील आरोपांवर निकाल दिला आहे.
आम्ही मानवाधिकार संघटना आणि अन्य संस्थांच्या अनेक अहवालांचा विचार करत असल्याचं न्यायाधिकरणानं निकाल देताना म्हटलं. आम्ही क्रूर कृत्यांची सविस्तर माहिती घेतली आहे. आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येनं आंदोलक मारले गेले आहेत. शेख हसीना यांना बॉम्ब हल्ल्यांचे आदेश दिले होते. हसीना यांच्या विरोधात आमच्याकडे अनेक पुरावे आहेत, असं न्यायालयानं सुनावणीत म्हटलं.
शेख हसीना यांनी मानवतेविरोधात गुन्हे केल्याचं लवादानं म्हटलं आहे. 'शेख हसीना यांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवर हेलिकॉप्टरनं बॉम्ब टाकण्याचे आदेश दिले होते. अवामी लीगचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सुनियोजित हल्ले केले. पक्षाच्या नेतृत्त्वाला याची कल्पना होती,' असं न्यायालयानं निकाल देताना नमूद केलं आहे.
या प्रकरणात बांगलादेश सरकारच्या वकिलांनी शेख हसीना यांना मृत्यूदंड देण्याची मागणी केली आहे. शेख हसीना यांच्या आदेशामुळे १४०० आंदोलक नाहक मारले गेले. हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा न दिल्यास मारल्या गेलेल्या लोकांवर अन्याय होईल, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
निकाल देण्याआधी संपूर्ण सुनावणी रेकॉर्ड केली जात आहे. त्यामुळे निकालाची प्रक्रिया अधिक वेळ चालू शकते आणि निकाल येण्यास वेळ लागू शकतो. या प्रकरणाचा निकाल येण्याआधी बांगलादेशातील वातावरण तापलं. अनेक ठिकाणी आंदोलनं सुरु झाली. काही ठिकाणी हिंसाचाराच्या, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.
राजधानी ढाक्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे सरकारनं हिंसक आंदोलन करणाऱ्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निकाल येण्यापूर्वी माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ऑडिओ संदेश पाठवला. माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांना कोणताही आधार नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाची मला अजिबात काळजी वाटत नाही, असं शेख हसीना म्हणाल्या.
ऑगस्ट २०२५ च्या पहिल्या आठवड्यात बांगलादेशात हिंसक आंदोलन सुरु झालं. यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या भारतात आश्रयाला आल्या. बांगलादेशात सध्या मोहम्मद युनूस यांचं सरकार आहे. शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी घालण्यात आली आहे. देशात फेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment